कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन महिला जागीच ठार
नागपूर: दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळल्याने . यात कारचे अक्षरश:कारचे दोन भाग होऊन कारमधील बसुन असलेल्या तीन महिला जागीच ठार असुन कारचालक व एक महिला गंभीर जखमी असुन त्यांना नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये एक महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल (३२, रा. कळमेश्वर), रोशनी अनूप जयस्वाल (३०) व माधुरी अंगद जयस्वाल (३६) दोघीही रा. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल (३२) दाेघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकाेना (मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी हाेण्यासाठी जात होते.