शेकडो नागरिकांच्या उपस्थीतीत,
उत्साही वातावरणात पार पडला सोहळा.
मारेगांव तालुक्यातील कोलगांव येथील घटना...
मारेगाव : कैलास ठेंगणे
कोलगांव - ब-याचं वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर होत्याचं नव्हत करीत धो-धो बरसनारा निसर्ग, काही दिवसाच्या उसंतीनंतर असा काही पुन्हा बरसेल, असं कुणाच्याही ध्यानी मनी नव्हत.
नियोजित सोहळ्याची वेळ जवळ आलेली.
सोहळ्याचा तो नेमका योगायोगचं म्हणावा की काय, आणी घडलही तसचं.
" लोकार्पण सोहळा जलशुध्दीकरण सयंत्राचा - आणी बरसल्या जलधारा... "
असीचं काहिसी म्हणण्याची सर्वांवर वेळ आली. ही घटना आहे सोळा ऑक्टोबर चे दुपारी चार वाजताचे सुमारास मारेगांव तालुक्याचे कोलगांव येथे घडलेली.
आदिवासी बहूल असलेल्या मारेगांव तालुक्याचे पंचक्रोशीत वसलेल कोलगांव हे गांव, म्हणायला तसं वर्गलढ्याचा इतिहास लाभलेलं गांव. मात्र, अलिकडच्या काळात राजकिय पटलावर चिंदया-चिंदया झालेलं. आणी राजकीय नेतृत्वापासून विकास कामाचे साठी कोसो दुर पल्याड गेललं गावं, अशीच काहीशी गावाची झालेली ओळख.
म्हणायला श्रीमंतांच्या वस्तीचं गांव. मात्र गावात ना धड रस्ते, ना नाल्या, ना सांड पाण्याची सोय. बघाव तिकडे खड्डेचं खड्डे आणी नुसतीचं गटारगंगा. विकास नावाच्या बाळाने गावांत जन्मचं घेतला नाही की काय, अश्याच काहीश्या अवस्थेचं गांव.
गांव तसं चांगल मात्र वेशीवर टांगल. या म्हणीला साजेशी गावाची झालेली गत. याला सर्वस्वी गावातील लोकप्रतिनिधीचे उदाशीन धोरण हेचं जबाबदार असल्याचे गांवकरी बोलतात. म्हणुनच की काय, विकासाचे नावावर ग्रामस्थांनी ब-याचं वर्षापासून याचं देही याचं डोळा, गावात कधीच विकास कामाचा सोहळाचं बघीतला नाही.
यात बदल व्हावा असं अनेकांना मनापासून वाटायचे, याला मूर्त रूप आलेयं, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत. निवडणुका पार पडल्यात, आणी सजग नेतृत्वाच्या पुढाकारात ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेल्या सौ. आभिषा राजु निमसटकर यांना सरपंचपदी आरुढ करीत, सत्तेचे परिवर्तन घडविले, उमेदिच्या लोकप्रतिनिधिंकडे सत्तेची किल्ली सोपविली.
जनतेला दिलेला शब्द पाळत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीही कामाला लागलेत. आणी बघता-बघता लोकांच्या सहभागाने विकास कामांना गती आली. रखडलेली कामे मार्गी लागायाला सरूवात झाली.
असाचं हा प्रसंग, मा.आमदार संजीवरेड्ड़ी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून गावात जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठाण अंतर्गत नऊ लक्ष रुपयाच्या निधीतून जलशुध्दीकरण संयत्राचे निर्माण झाले. याचं विकासकामाचा लोकार्पण सोहळा... मा. आमदार संजीवरेड्ड़ी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य मा. अनिल देरकर, सरपंच सौ.आभिषा राजु निमसटकर, ग्रामसेवक श्री.अनिल रामटेके यांचे विशेष उपस्थीतित पार पडला. यावेळी सामाजीक कार्यकर्ते संजय पारखी, राजु आवारी, चेतन आवारी, संतोष मेश्राम यांचेसह उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्राम पंचायत सदस्य सौ.जया जुनगरी, सौ. रवीता अवताडे, रविंद्र आत्राम, गृरुदास घोटेकार यांचीही प्रामुख्याने उपस्थीत होती.
विशेष म्हणजे... नेमक्या लोकार्पण सोहळ्याचे वेळी पावसाच्या सरी कोसळत असतांना देखील, गावातील मोठ्या संख्येने नागरिक सोहळ्यात सहभागी झाले होते. तर लक्षणीय संख्येने उपस्थीत असलेल्या महिलांमुळे सोहळ्याचा उत्साह द्विगुणीत झाला होता.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर जुनगरी, सुधाकर उपरे, वामन धोंगडे, बंडू भोयर, सुनिल वासाडे, बाबाराव वासाडे, रामा गौरकार, अरुण बलकी, महादेव जीवतोडे, नाना भोंगळे, बापुजी आवारी, बंडू आत्राम, गजू ठवसे, तुळशीराम फरताडे, अरविंद नागरकार, दशरथ सोनटक्के, देवराव बलकी, बाबाराव खुसपुरे, मनोहर चीट्टलवार तसेचं पो.पा. अरुण निमसटकर यांचेसह ग्रा.पं. कर्मचारी राहुल पुनवटकर, मनोहर निमसटकर यांनी लोकार्पण सोहळ्याचे यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. तर सोहळ्याचे सुत्रसंचालन आणी आभार राजू नीमसटकर यांनी केले.