खरीप हंगामातील पिकाचे व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरसिंगद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रिलायंस फाऊंडेशन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाचे व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि. १० जुलै २०२१ रोजी करण्यात आले.
या ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी तज्ज्ञांना सोयाबीन आणि कपाशी पिकावरील कीडरोग ,खत व्यवस्थापन याविषयी विविध प्रश्न विचारले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे समाधान डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे सहाय्यक प्राध्यापक मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र तथा कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ तसेच डॉ. पंजाबराव कृषी विदयापीठ अकोलाचे प्रो.राजेंद्र जाणे यांनी केले कमी खर्चामध्ये उत्पन्न कसे घ्यावे हे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांचा सल्ला शेती करण्यासाठी खूप महत्वाचा आहे हे दिसून आले अश्या पद्धतीने कार्यक्रम उपयुक्त झाला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.