Type Here to Get Search Results !

लग्नानंतर १० दिवसांतच विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

लग्नानंतर १० दिवसांतच विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


जळगाव शहरातील दांडेकर नगरात अत्यंत दुःखद घटना घडली.  हातावरील मेहंदी निघत नाही  तोच लग्न झाल्यानंतर १० दिवसांतच विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  या घटनेमागचे कारण अजूनही  समजले नसून शहर पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे.
करीना सागर निकम ( वय १९,  रा , रमाबाई नगर , दांडेकर नगर दूध फेडरेशनजवळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै २०२१ रोजी सागर राजू निकम याच्याशी नुकताच १० दिवसांपूर्वी रमाबाई नगर येथे विवाह झाला होता. करीनाच्या सासू निर्मलाबाई राजू निकम या  जळगाव शहरातील माजी नगरसेविका आहेत. करीना सागर निकम हीने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

यावेळी सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. दिर नागेश निकम घरात झोपलेला होता. सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेर होत्या. यावेळी करीनाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोद करण्यात आली आहे. करीना हीचे माहेर यावल तालुक्यातील न्हावी येथील आहे. करीनाने गळफास का घेतला याबाबत कारण गुलदस्त्यात आहे.  याबाबत  शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी तपास करीत आहे . करीना हिचे माहेरची मंडळी देखील रुग्णालयात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies