जागतिक सुसंवाद दिनानिमित्य शेतकऱ्यांनी रिलायंस फाऊंडेशनच्या सेवेसंदर्भात आपला अभिप्राय व्यक्त केला.
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
रिलायंस फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७-०५-२०२१ रोजी जागतिक सुसंवाद दिनानिमित्य शेतकऱ्यांसाठी रिलायंस फाऊंडेशनच्या माहितीचा शेतकऱ्यांनी आपल्या पिकामध्ये काय काय लाभ घेतला याविषयी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कोरोना काळामध्ये कुठलाही पर्याय उपलब्ध
नसल्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळणे कठीण झाले होते परंतु रिलायंस फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी शेतकयांना वेळेवर शेतीविषयी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम यशस्वी पण झाले शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांनी माहितीचा लाभ घेतल्यानंतर त्यांना शेतीतील उत्पन्नामध्ये वाढ झाली,रासायनिक खताच्या खर्चामध्ये बचत झाली, नुकसान टळले,इतर खर्चामध्ये बचत झाली अश्याप्रकारे विविध अनुभव या कार्यक्रमध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विष्णू नेमाडे गाव- रुद्रापूर,सीमा खैरकर गाव - सरपदी,लिलाधर कार्लेकर गाव - सालेभट्टी, किशोर राऊत गाव - डोंगरखर्डा,प्रवीण शेंडे गाव-कोटंबा,प्रफुल केवले गाव - सारफळी,संजय घोंगे गाव - नायगाव ,मुकुंद गावंडे गाव - नायगाव ,अमोल भगत गाव - कुंभारी, सतीश नंदुरकर गाव - कोठा अश्या विविध गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तसेच त्यांचे अनुभव व्यक्त केले त्यावेळी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉ. डी. एस कंकाळ सहाय्यक प्राध्यापक तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद मगर कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ व कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी रिलायंस फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल रिलायंस फाऊंडेशनचे आभार मानले आणि या सर्व तज्ञांनी रिलायंस फाऊंडेशन सोबत शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले या अनुषंगाने हा कार्यक्रम उपयुक्त झाला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.