Type Here to Get Search Results !

सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू करा

सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू करा  

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन केली मागणी.

पंकज नेहारे/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाना अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय विभागामध्ये भरती गेल्या  दोन ते तिन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सरकारने पदभरती काढली नसल्याने अनेक पदाच्या रिक्त जागा आहे. माहिती अधिकारामाध्ये ही ही बाब उघकीस आली असुन काही तुटपुंज्या जागांवर नौकर भरती घेवून शासना तर्फे नौकर भरतीचा देखावा केल्या जात आहे.
                                        अनेक विद्यार्थी मागील पाच ते सहा वर्षांपासून सतत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. परंतु मागील पाच ते सहा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय विभागा तर्फे कुठलीही शासकीय नौकर भरती पघेण्यात आली नाही. नौकर भरती बाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून फक्त आश्वासन दिले जात असल्याने शासकीय नौकर भरती न झाल्याने अनेक विद्यार्थी नैराश्येच्या गर्तीत गेले आहे अनेक स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यी मानसिक ताणाने टोकाचे पाऊस उचलत आहेत. याचे एक उदाहरण स्वप्निल लोणकर अशे कित्येक स्वप्निल लोणकर याच नैराश्येतू जात आहेत. 
यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने  शासनाच्या विविध विभागा तर्फे भरती प्रक्रिया सुरू  करण्यात यावी मागणीचे निवेदन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मारेगाव यांच्या कडून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन  पाठविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies